नवे विद्युत विधेयक देशाच्या हिताचे नसून सर्वात जास्त फटका महाराष्ट्रातील वीजवितरणला बसेल : संजय राऊत

0

वाढत्या वीजबिलांबाबत केंद्र सरकारकडून तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. अशात नवीन विद्युत विधेयक तयार केले जात असल्याने याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थिती केली आहे. तयार करण्यात येत असलेले नवे विधेयक हे देशाच्या हिताचे नसून त्याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्रातील वीजवितरणला बसेल, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

आता केंद्र सरकारकडून नवीन विद्युत विधेयक तयार करण्यात आले असून या विधेयकाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, विद्युत विधेयकावर चर्चा झाली आहे. राज्यातील बरेच लोक दिल्लीत येऊन बसलेत. अचानक बील घेऊन येत आहेत. महाराष्ट्र राज्यात एमएसईबीला याचा फटका बसेल. स्टेट इलेक्ट्रिक कंपन्यांसाठी ही बीलं धोकादायक ठरतील. हे बील देशाच्या हितासाठी नसून वीज कंपन्यांसाठी धोक्याची घंटा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन यावर बोलायला हवे.’

महाराष्ट्रातील वाढत्या वीजबिलाचा प्रश्न अजूनही तसचे. अचानक वीजबिले वाढून आले कि, नागरिकांतून संताप व्यक्त केला जातोय. अशात आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात तात्काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विजेचे पोळ, तारा तुटून खाली डोळ्या होत्या. त्याचा मोठ्या प्रमाणात तोटा वीज वितरण कंपनीला सहन करावा लागला. त्यात नुकसानग्रस्त भागात वीज वसुली न करण्याचे आदेश ऊर्जामंत्री यांनी दिले आहेत.

See also  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-व्हाउचर-आधारित डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रूपी केले लाँच