वोडाफोन-आयडिया संदर्भातील बातम्यांने ग्राहक आणि गुंतवणूकदार धास्तावले.

0

स्मार्टफोनच्या क्षेत्रात सगळ्यांत वेगाने वाढणारी बाजारपेठ म्हणून आधी भारताचं नाव अग्रक्रमाने घेतलं जायचं. आता मात्र टेलिकॉम कंपन्या अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. सध्या वोडाफोन-आयडिया संदर्भातील बातम्यांने ग्राहक आणि गुंतवणूकदार जरा धास्तावलेले आहेत.

टेलिकॉम सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी व्होडाफोन आणि आयडिया काही वर्षांपूर्वी एकत्र आल्या. तेव्हापासून या दोन्ही कंपनींची जोरदार चर्चा सुरु आहे. कंपनीचं वाढतं नुकसान आणि नव्याने येणाऱ्या गुंतवणुकीत घट झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कंपनीचे चेयरमन असलेले कुमार मंगलम बिडला यांनीही पदाचा राजीनामा दिला. अफाट प्रयत्नांनंतरही कंपनीच्या अडचणीत घट कमी आणि वाढच जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे जर कंपनी बंद झाली, तर 28 कोटी ग्राहकांना याचा फटका बसेलच. सोबतच देशातील या बड्या 8 बँकांनांही फटका बसेल.

व्होडाफोन आयडियाच्या अडचणी वाढल्याने एसबीआयसह देशातील 8 मोठ्या बँकाही प्रभावित होऊ शकतात. कंपनीवर 1.80 लाख कोटींचे कर्ज आहे, जे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे घेतले आहे. त्यात बँकांचा एक्सपोजर देखील समाविष्ट आहे. जर वोडाफोन आयडिया बंद झाली, तर या बँकांची मोठी रक्कम देखील डिफॉल्ट होऊ शकते.

जर व्होडाफोन आयडिया बंद झाली, तर त्याचा परिणाम देशातील मोठ्या मोबाईल ग्राहकांवरही दिसून येईल. व्होडाफोन आयडियाचे ग्राहक संख्या 28 कोटींच्या घरात आहेत. जर कंपनीच बंद झाली तर तर या ग्राहकांची संख्या बंद होणे स्वाभाविक आहे. विशेषतः Jio, Airtel यांसारख्या इतर कंपन्यांना याचा लाभ नक्कीच मिळू शकतो. कारण त्यांना या मोठ्या ग्राहक बेसचे भांडवल करायचे आहे.

कंपनीच्या डोक्यावर मोठं कर्जाचं डोंगर आहे. ते दररोज वाढत चाललंय. कंपनीचा पाय खोलात असल्याने कोणी गुंतवणूक करण्यास तयार नाही. त्यामुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे चेयरमन यांनी सरकारला आपल्या कंपनीतील आपला हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला. पण सरकारकडून कंपनीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

See also  संयुक्त किसान मोर्चाने 26 मे रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा. प्रमुख 12 विरोधी पक्षांनचा पाठिंबा

कंपनीच्या चेयरमनने राजीनामा दिल्याने कंपनी बंदच होणार, असे तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान व्होडाफोन इंडियाचे सीईओनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. आपली कंपनी बंद होणार नाही, असा विश्वास त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलाय. पण आकडे दुसरंच काही सांगतायेत.