देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली म्हणून सरकारकडून वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे : अण्णा हजारे

0

अहमदनगर :

देशातील सद्यपरिस्थितीवर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनता कुंभकर्णासारखी झोपलीय, असं मत व्यक्त केलं.

‘आपण आंदोलने करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारकडून वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. अशात जनता कुंभकर्णासारखी झोपली असल्यामुळे हे शक्य आहे,’ असे मत हजारे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज देशातील राजकीय परिस्थिती, केल्या जात असलेल्या कायद्यावरून सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘सध्याचे देशातील सरकार बदलण्यासाठी आता जनतेने आवाज उठवून ताकद उभी केली पाहिजे. तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल. या देशात सरकारकडून मागणी नसताना लादण्यात येत असलेल्या कायद्यांवर, सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणांवर हजारे यांनी खंत व्यक्त केली.

यावेळी जनतेबाबत बोलताना हजारे म्हणाले की, ‘देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही. असेच कायदे आणि निर्णय लादण्यात येतील, असे मत यावेळी हजारे यांनी व्यक्त केले आहे.

See also  लसीकरण केल्यानंतर घ्यावी स्वतः ची काळजी.