ठाण्यात पानबगळ्यांचा मृत्यु : बर्ड फ्ल्यू चे संकट ?

0

ठाणे:

ठाण्यातील वाघबीळ परिसरात १५ पाणबगळे मृतावस्थेत आढळल्याने काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात हिमाचल प्रदेश,राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश, या राज्यांत बर्ड फ्यू साथ वेगाने पसरत असतानाच या पाणबगळ्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा शोध घेतला जात आहे. आरोग्य यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकारावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरातील विजय नगर, वाटिक इमारत येथून पक्षांच्या मृत्यूची तक्रार आली होती. अशी तक्रार मिळताच ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी आले. घटनास्थळी १५ पाणबगळा जातीचे पक्षी मृत अवस्थेत आढळून आले. या पक्षांना पशुवैधकीय विभागामार्फत पशुसंवर्धन रुग्णालय मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

सध्या केरळ व अन्य राज्यांत बर्ड फ्लूचे संकट घोंगावत असताना ठाण्यात पक्षांच्या मृत्यूच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला आहे. सदर पाणबगळ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत सविस्तर अहवाल पशुसंवर्धन रुग्णालय, मुंबई यांच्याकडून प्राप्त होईल असे पशुवैधकीय विभागातून कळवण्यात आले आहे. परंतु, याबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

See also  पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभागाचे विशेष धोरण..!