चंद्रकांत दादांचे रश्मी वहिनींना पत्र !

0

पुणे :

शिवसेनेनं भाजपशी असलेली मैत्री तोडून वैचारिक भिन्नता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा संसार सुरु केला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवून मोठा पक्ष बनलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. सद्या जुने मित्र असलेल्या शिवसेना व भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दात टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. सामनातून बी जे पी नेत्यांवर कडवट व गलिच्छ शब्दात टीका केली जाते. या सामनातील टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी व सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याकडे या आक्षेपार्ह भाषेसंदर्भात तक्रार केली आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना रीतसर पत्र लिहिलं आहे.

 

See also  महाराष्ट्रात लॉकडाउन लागण्याची शक्यता : विजय वडेट्टीवार