राजू शेट्टी यांनी घेतला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय…

0

कोल्हापूर :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीत संबध ठिक नसल्याच्या चर्चा समोर येत असताना राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे.

राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज कोल्हापुरात पार पडली. यावेळी राजू शेट्टींनी आपली भुमिका स्पष्ट केली.

“शेतकऱ्यांची फसवणूक होणार असेल तर आम्ही आमची भूमिका घेऊन इथून पुढे वाटचाल करणार आहोत असा निर्णय कुठेतरी घ्यावा लागेल. आज सकाळपासून झालेल्या चर्चेचा सार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज मी तुमच्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो की, महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे सर्व संबंध संपले आहेत.” अशा शब्दात शेट्टींना आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, गेले अनेक दिवस राजू शेट्टी सरकारवर नाराज होते, पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं मात्र हे आश्वासन पाळलं गेलं नाही. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी राजू शेट्टी गेली अनेक दिवस संघर्ष करत आहेत.

 

See also  शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात एक दिवसाची कोठडी.