देशाला महासत्ता बनवायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक : नितीन गडकरी

0

नागपूर :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा एक आठवणीतला किस्सा सांगितला आहे. शिक्षक दिनानिमित्त ते बोलत होते. आज शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. शिक्षकांच्या मारा मुळे भाषण द्यायला लागलो. शिक्षकांचा मार पडला नसता तर भाषण द्यायला शिकलो नसतो, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

विद्यार्थी हा एक परिवार आहे

या कार्यक्रमात नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘शिक्षणातून मानवाचं जीवन बदलत असतं. देशाला महासत्ता बनवायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे. शिक्षक-पालक मॅनेजमेंट विद्यार्थी हा एक परिवार आहे आणि या परिवारात ऐक्य असेल तर चांगले विध्यर्थी घडले. त्याचा देशाला फायदा होईल’, असं गडकरी म्हणाले आहेत.

सुशिक्षित बनत असताना सुसंस्कृत बनणं महत्वाचं

आपल्या देशातील कुटुंब पद्धती ही संस्कारी आहे. पाश्चात्य देशात ते पाहायला मिळत नाही. सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं यात मोठा फरक आहे. त्यामुळे सुशिक्षित बनत असताना सुसंस्कृत बनणं महत्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. कोणीच 100 टक्के परिपूर्ण असू शकत नाही. कितीही चांगला माणूस असला तरी त्यात काही न काही गुणदोष असतातच. गुणदोष कमी करण सातत्याने करण्याची गरज आहे. आपण सोडून जाऊ तेव्हा आपल्या कार्याची स्तुती होणं महत्वाचं आहे, असं ते म्हणाले आहेत.

संजय दत्तने का घेतली भेट?

अभिनेता संजय दत्तने आज गडकरींची भेट घेतली. विदर्भात फिल्मसिटी उभारण्यासाठी संजय दत्तने गडकरींची भेट घेतल्याचं सांगण्यात येतं. संजय दत्तने अचानक नागपूर दौरा केल्यामुळे विदर्भात फिल्मसिटी उभारली जाण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. विदर्भात चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बऱ्याच काळापासून रखडले आहे. त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर संजय दत्त याने नागपूर दौरा केल्याचं बोललं जातं आहे. या दौऱ्यात गडकरी आणि नितीन राऊत यांच्यासारख्या दोन पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या. याशिवाय, संजय दत्तने शनिवारी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचीही पाहणी केल्याची माहिती आहे.

See also  केंद्राने महाराष्ट्राला लस पुरवठा केला नाही तर तीन दिवसात लसीकरण बंद : आरोग्यमंत्री राजेश टोपे

नागपूर प्रदूषण मुक्त करायचंय

ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणापासून नागपूरला मुक्त करून प्रदूषण मुक्तीत एक नंबरवर आणायचं आहे. रुग्णवाहिका, पोलीस गाडीवर सुमधूर हॉर्न असला पाहिजे. इतर वाहनांना भारतीय संगिताचा हॉर्न करण्याची तयारी आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.