समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

0

पुणे :

समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडला जाणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडला जाणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे – शिरूर – अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. केसनंद गावातून या मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे.

केसनंद गावातून सुरू होणारा हा उड्डाण मार्ग 53 किलोमीटरचा असेल. हा मार्ग शिरूरपर्यंत जाईल. तिथून पुढे अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. त्यासाठी आणखी 2 हजार 50 कोटी रुपये खर्च येणार असून एकूण खर्च 9 हजार 565 रुपये इतका येणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर इतकी असेल.

See also  पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी पवारांच्या तीन पिढ्या मैदानात