बाईच्या डोक्यावर अपघात झालाय का भाऊ ? उर्मिला मातोंडकर

0

मुंबईः

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्या अधिकच आक्रमक झाल्या आहेत. अलीकडेच त्यांनी केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. तसंच, त्यांच्या या ट्विटचा रोख बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्याकडे असल्याचंही बोललं जात आहे.

कंगना राणावत आणि शिवसेनेत झालेल्या वादानंतर कंगना पहिल्यांदाच मुंबईत परतली आहे. यानंतर कंगनानं मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असं म्हणत शिवसेनेला डिवचलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनीही अप्रत्यक्षरित्या कंगनावर निशाणा साधला आहे. त्यांनी तसं एक ट्विटही केलं आहे.

बाईच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ? असं ट्विट उर्मिला यांनी केलं आहे. तसंच, माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभं राहण्यासाठी, असंही त्यांनी म्हटलं आहे. उर्मिला यांच्या ट्विटवरुन आता पुन्हा एकदा कंगना व उर्मिला मातोंडकर यांच्यात शाब्दिक सामना रंगणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

See also  उदयनराजे नी केले साताऱ्यात ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन.