हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम ‘मंथन’ परिषदेचे उदघाटन पर्यावनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार

0
slider_4552

मुंबई :

हवामान(Weather) बदलाचे दुष्परिणाम आणि विकासाची उद्दिष्टे ह्याचा कृती आराखडा तयार करणार असून दोन दिवसाची मंथन परिषदचे आयोजन(Organizing Manthan Parishad) करण्यात आले आहे. हि परिषद ८,९ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परिषदेचे उदघाटन पर्यावनमंत्री(Minister of Environment) आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचं समजले आहे.

हवामान(Weather) बदलाचे होणारे दुष्परिणाम कमी करता येईल का ? तसेच पर्यावरण( Environment) संवर्धन साधताना विकासाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे या उद्दिष्टाने विधान परिषदेचे( Legislative Council) उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे ह्यांनी पुढाकार घेतला आहे तसेच हि होणारी परिषद मुंबई आणि स्त्री आधार केंद्र व पुणे यांच्या वतीने मंथन परिषद आयोजित केली आहे.

सकाळी ११ ते ३ दरम्यान हि झूम ऍप वरून पार पडेल. ह्या मध्ये परिषदेचे अध्यक्ष डॉ नीलम गोऱ्हे तसेच हवामान(Weather) बदल, पर्यावरण तञ् मंडळी उपस्थित राहणार असून परिषदेत काय निर्णय होतील ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  परमबीर सिंह यांची माघार घेत अनिल देशमुखांना अप्रत्यक्षपणे क्लीन चिट