ओमिक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे काळजी घेतली जात आहे : राजेश टोपे

0

जालना :

ओमिक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे दखल घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतपर्यंत 800 जणांची (RTPCR) चाचणी घेण्यात आली आहे.

यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटक सिमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नसून केंद्र घेईल त्या निर्णयाप्रमाणे राज्य निर्णय घेईल असं आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय नागरीकांनी काळजी घ्यावी असंही टोपे म्हणाले.

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात 12 तर पुण्यातील लॅबमध्ये 16 असे एकूण 28 नमुने जिनोमिक सिक्वेसिंग साठी देण्यात आले आहे. या नमुन्यांचे अहवाल अजून आले नाही. त्यामुळे या नमुन्यांचे अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकमध्ये दोन ओमिक्रॉन रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून यापैकी एका रुग्णाला सुट्टी देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचं ते म्हणाले. आतापर्यंत जगातील 30 पेक्षा अधिक देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे. राज्यातील नागरीकांनी लसीकरण करून घेऊन नागरिकांसाठी करण्यात आलेले नियम पाळावे असं आवाहन त्यांनी केलं.

रशियाहून अंबरनाथमध्ये आलेली 7 वर्षाची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. यावर देखील त्यांनी भाष्य केलं. जर ही मुलगी पॉझिटिव्ह आढळून आली असेल तर तिच्या संपर्कात कुणीही न राहता तिला आयसोलेट (Isolation) केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

नगर येथील शासकीय रुग्णालयातील आगीच्या घटनेचा अहवाल अजूनही आलेला नाही. हा अहवाल देण्यासंदर्भात मी विनंती करीन तेथील कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याच कारण नाही असही ते म्हणाले. ऑक्सीजन अभावी राज्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. 1 नोव्हेंबरनंतर राज्यात आलेल्या विमान प्रवाशांची यादी घेण्यात आली असून त्यांचं सर्व्हेक्षण करण्याचं काम सुरू असून त्यांच्या संपर्कात आळलेल्याची तपासणी सुरु असल्याच टोपे म्हणाले.

See also  कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी : नितीन गडकरी