बाणेर :
मुळानदी किनारा व मुळा रामनदी संघमावरील आणि सोंडमळा देवराई वाचवणे आणि नदीपात्रात भराव टाकल्या मुळे निर्माण होणाऱ्या पूर समस्या याबाबत वनविभाग आणि महापालिका तसेच जायका प्रकल्प अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ आणि नदी बचाव व सोंडमळा देवराई बचाव समिती यांच्यात प्रत्यक्ष पाहणी दौरा पार पडला.
या पाहणी दौऱ्या दरम्यान सोंडमाळा देवराई बचाव समितीने अधिकाऱ्यांना येथील झाडांचे महत्त्व, येथील जैवविविधतेचे महत्व सांगून पर्यावरणाला धक्का न लावता विकास कामे करावी असे सूचना दिल्या. तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील सुरू असलेले नदीतील अतिक्रमण त्वरित थांबवावे अशी मागणी ही नागरिकांनी केली. यावेळी या ठिकाणी प्रकल्प अधिकारी मुकुंद शिंदे, वन विभाग अधिकारी मनोज बारबोले, जायकाचे अधिकारी तायडे, अमोल बोल्हार आदी उपस्थित होते.
या संगमा ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी आणि सुलोचना अभिमन्यू धनकुडे (८० वर्ष) यांनी त्यांच्या तेथील ५५ वर्षाच्या प्रत्यक्ष अनुभवावरून सोंडमळा देवराईचे महत्व, तेथील धार्मिक आणि ऐताहासिक परंपरा या विषयी सर्व अनुभव कथन केले. तसेच विविध पर्यावरणप्रेमिनी प्रकल्पा मुळे होणारे तोटे निदर्शनास आणून दिले व अनावश्यक गोष्टींना तीव्र विरोध केला. यावेळी देवराई बचाव समितीचे सुधाकर धनकुडे, आमेय जगताप, शैलजा देशपांडे, वंदना चौधरी, मेघना भंडारी, मोरेश्वर बालवडकर आदी उपस्थित होते.
मनपा अधिकाऱ्यांनीदेखील सुधारीत आराखडा तयार केलेला आहे. त्यात आणखी सुधारणा करून सर्व झाडे, धार्मिक व ऐताहासिक स्थळाना बिलकुल हात लावणार नाही. तसेच पिंपळे निलख बाजूला जे चालू आहे तशी कुठलीही कृती आम्ही करणार नाही असे प्राथमिक आश्वासन दिले. थोड्याच दिवसात पुढील बैठक होऊन बचाव समिती लेखी आश्वासन मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे बचाव समितीकडून सांगण्यात आले.