काँग्रेसची भारत जोडो यात्रा तळपत्या मशाली घेऊन महाराष्ट्रात दाखल..

0
slider_4552

देगलूर :

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर निघालेल्या या यात्रेत हजारो कार्यकर्ता हातात तळपत्या मशाली घेऊन चालत आहेत.

या यात्रा निमित्त १४ दिवस महाराष्ट्र राहुल गांधी यांचा मुक्काम असणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज अखेर महाराष्ट्रात दाखल झालीय. राहुल गांधी यांच्या या यात्रेचं अतिशय जलल्लोषात स्वागत करण्यात येतंय. ही यात्रा तेलंगणाहून महाराष्ट्राच्या दिशेला निघाली होती. अखेर तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर ही यात्रा दाखल झाली आणि नंतर नांदेडच्या देगलूर इथे पोहोचली. यावेळी वातावरण अतिशय वेगळंच होतं. या यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांच्या हातात मशाल होती. खरंतर भारतात येताना मशाल घेऊन प्रवेश करायचा यासाठीच या मशाल यात्रेचं काँग्रेसकडून आयोजन करण्यात आलं होतं. रात्रीच्या अंधारात अतिशय रोमहर्षक वाटावं अशा वातावरणात ही मशाल यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं. देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ही रॅली पुढच्या दिशेचा प्रवास करेल. तेलंगणातील मेन्नूर या ठिकाणी आज राहुल गांधींची सभा झाली होती. त्यानंतर या यात्रेने महाराष्ट्राच्या दिशेला निघाली होती. अखेर आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ही भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरु झाली होती. ही यात्रा दक्षिण भारतातील सर्व राज्यांना भेट देत आता महाराष्ट्रात दाखल झालीय.

ही यात्रा महाराष्ट्रात ३४४ किमी चालणार आहे. ही पदयात्रा आहे. त्यामुळे ही यात्रा पुढचे १५ दिवस महाराष्ट्रात राहणार आहे. महाराष्ट्रातील नांदेड, वाशिम, अकोला, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात एकूण १४ ठिकाणी थांबणार आहेत. ही यात्रा १५ विधानसभा आणि ६ लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे.

 

See also  भाजी आणि फलोत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान : कृषी मंत्री दादाजी भुसे