झिम्बाब्वे रोखणार का भारताचा विजयरथ…

0

मेलबर्न :

टी 20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील शेवटचे 3 सामने रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) खेळले जाणार आहेत. यातील तिसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात खेळला जाणार आहे.

हा सामना मेलबर्न येथे पार पडणार आहे. भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल.

भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यामधील 3 सामन्यात भारताच्या पदरात यश पडले आहे. मात्र, भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताकडून विराट कोहली याने 3 अर्धशतके साकारली आहेत. यासोबतच तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. दुसरीकडे, गोलंदाजीत अर्शदीप सिंग याने 9 विकेट्स चटकावल्या आहेत. तसेच, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हेदेखील शानदार फॉर्ममध्ये आहेत.

याव्यतिरिक्त झिम्बाब्वे संघाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 1 धावेने विजय मिळवला होता. तसेच, त्यांनी बांगलादेशविरुद्धही शानदार प्रदर्शन केले होते. अशात भारतीय संघाला या सामन्यात सावध राहावे लागेल.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघ आमने सामने आकडेवारी
भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघाी आमने-सामने आकडेवारी पाहिली, तर दोन्ही संघ 7 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 5 वेळा विजय मिळवला आहे, तर उर्वरित 2 सामन्यात झिम्बाब्वे संघाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाला 2015मध्ये 10 धावांनी आणि 2016मध्ये 2 धावांनी झिम्बाब्वेकडून पराभूत व्हावे लागले होते.

वनडे विश्वचषकात भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तर झिम्बाब्वेला एक सामना आपल्या नावावर करण्यात यश आले होते.

कधी आणि कुठे होणार सामना?
भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाईल.

 

See also  भारत हॉकी सुपर ४ मधील दुसऱ्या लढतीत मलेशियाला ३-३ बरोबरीत रोखत अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर