औंध :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने औंध गाव येथे ॲड. मधुकर मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर मुंडे आणि कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले आहे. या मंदिराचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा ॲड. मधुकर मुसळे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते पार पडला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देताना ॲड. मधुकर मुसळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती योगदान फार मोठे आहे. त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयामुळे आज भारत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानबिंदू प्राप्त झाला आहे. त्यांच्यामुळेच काश्मीर मध्ये प्रत्येक शाळेमध्ये अभिमानाने भारतीय तिरंगा फडकत आहे. अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाचे आचार-विचार जोपासले जावे. त्यांच्या कार्याला नतमस्तक व्हावे. त्यांचे काम हे पूजनीय आहे म्हणून मयूर मुंडे आणि कार्यकर्त्यांनी एक आदर्श मंदिर उभारले आहे. ही खरंच एक चांगली बाब आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मयुर मुंडे आणि कार्यकर्त्यांनी केले. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यावर अतिशय सुरेख अशी कविता मयूर मुंडे यांनी रचली आहे व ती मोदी भक्तांना पाहायला मिळावी म्हणून मंदिराजवळ काव्य फलक लावला आहे.
या वेळी के के नायडू, केसारामजी परिहार, शेखर विघ्ने, ओमाररामजी चौधरी, मिलिंद कदम, आशुतोष देशपांडे, अक्षय सांगळे, संकेत सांगळे, वेलारामजी चौधरी, विनय शामराज, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.